
मुंबईसाठी पुढचे काही तास धोक्याचे; रविवारीही ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तास सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असा अंदाज





















































