Search
Close this search box.

हा तर फक्त ट्रेलर! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पावसाने मोठी सुट्टी घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस होतोय. संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर व उपनगरातही पाऊस बरसतोय. पण हवामानातील मोठ्या बदलांमुळे आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, घाटांच्या भागात सर्वत्र व्यापक पाऊस झाला असून, काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस नोंदविला गेला आहे. जुलै महिन्यात मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामानात मोठा बदल झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट

नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवार  ते गुरुवार  दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. तसंच, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आदी घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. शहरात मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज. 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला बळ मिळत असून उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. घाट परिसरात प्रवास करताना सावधगिरी बाळगा. वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईला पावसाचा यलो अलर्ट

मुंबईला पावसाचा यलो अलर्ट, तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने आता मुंबईसह सिंधुदुर्ग कोल्हापूर अहिल्यानगर सांगलीला यलो अलर्ट दिला आहे.  ठाणे रायगड पालघरला अद्याप ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

दिल्लीच्या जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज सुरु असताना तिथे फूड डिलीव्हरी बॉय पोहचला. महाराष्ट्रातून जेवण ऑर्डर करण्यात आले होते. जेवण ऑर्डर करणाऱ्याचे नाव आणि जेवण पाठवण्याचे कारण जाणून सगळेच शॉक झाले.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज सुरु असताना तिथे फूड डिलीव्हरी बॉय पोहचला. महाराष्ट्रातून जेवण ऑर्डर करण्यात आले होते. जेवण ऑर्डर करणाऱ्याचे नाव आणि जेवण पाठवण्याचे कारण जाणून सगळेच शॉक झाले.