पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला फडणवीस सरकारने प्रतिसाद दिला आहे. आता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बोट धारकांना मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश यांची मुंबई बँक अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्यासमवेत बैठक पार पडली. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 5 जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सध्या गेटवे परिसरात 97 लायसन्सधारक लाकडी बोटी कार्यरत
सध्या गेटवे परिसरात 97 लायसन्सधारक लाकडी बोटी कार्यरत असून या बोटी डिझेलवर चालत असल्याने बोट मालकांना दरमहा सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत इंधन खर्च करावा लागतो. प्रवासी व मच्छिमारी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. त्यावर इलेक्ट्रिक बोटींची किंमत अंदाजे 2.5 कोटी ते 6 कोटी रुपयांपर्यंत असल्याने मत्स्य संस्था, खासगी बोट मालक, वैयक्तिक लाभार्थी आणि असोसिएशन यांच्यासाठी कमी व्याजदरातील विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई बँकेने स्वतंत्र धोरण तयार करावे, असे निर्देश ही मंत्री नितेश राणे यांनी दिले. या आदेशानुसार उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 25 लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या 5 जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मुंबई बँकेने इलेक्ट्रिक बोटिंसाठी विशेष पॉलिसी तयार करून ती आगामी संचालक मंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करावी, असे निर्देश मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 25 लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार
या उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 25 लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या 5 जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मुंबई बँकेने इलेक्ट्रिक बोटिंसाठी विशेष पॉलिसी तयार करून ती आगामी संचालक मंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करावी, असे निर्देश मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबईचा मूळ निवासी असलेल्या कोळी बांधवाला आधुनिक करताना हरित पर्यावरण, इंधन बचत आणि आधुनिक जलपर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








