रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्यासंख्येनं शिवप्रेमी रायगडच्या दिशेनं निघाले आहेत. तर, बरीच मंडळी काही तासांनी प्रवास सुरू करणार आहेत. अशा या अतिशय खास आणि अनेकांसाठी भावनिक क्षण असणाऱ्या अनोख्या दिवसासाठी किल्ले रायगड आणि परिसरामध्ये होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनासह वाहतूक नियंत्रण पथकानंसुद्धा विशेष नियोजन केलं आहे. ज्या धर्तीवर 5 आणि 6 जूनरोजी किल्ले रायगड परिसरात अवजड वाहनांना तात्पुरत्या स्वरुपातील प्रवेशबंदी लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवांमधील वाहनं वगळण्यात आली आहेत.








