देशातील इंधन टंचाईचे संकट किती गंभीर आहे याची तीव्रता प्रत्यक्षात दिसू लागली आहे. इंधन टंचाईचा पहिला फटका भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनीला बसला आहे. जेट इंधनाचे दर प्रचंज वाढल्यामुळे या कंपनीने आपली अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच अनेक देशांतील उड्डामांची संख्या कमी आहे. या कंपनीने परदेशात जाणाऱ्यांसाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी परदेश दौरे टाळावे असे आवाहन केले आहे.
जेट इंधनाच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने जून 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी आपली अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. अनेक मार्गांवरील उड्डाणांची संख्याही कमी करण्यात आली आहे. एअरलाइनच्या या निर्णयाचा थेट परिणाम उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी किंवा व्यावसायिक दौऱ्यांसाठी आधीच तिकीट बुक केलेल्या प्रवाशांवर होणार आहे. दिल्लीतील मुख्य केंद्रातून शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय यांसारख्या प्रमुख ठिकाणांसाठीची उड्डाणे एअर इंडियाने रद्द केली आहेत.
सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरोंटोसारख्या ठिकाणांसाठीच्या उड्डाणांमध्येही कपात करण्यात आली आहे. एअरलाइनने दररोजच्या सुमारे 100 उड्डाणे कमी केली आहेत. सध्या प्रवासाचा ऐन हंगाम आहे. वाढत्या खर्चामुळे एअरलाइनला उड्डाणे कमी करण्याशिवाय पर्याय उरला नाही असे एअरइंडियाच्या मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले. जेट इंधनाच्या (एटीएफ) किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस प्रति बॅरल 99.40 डॉलर असलेल्या इंधनाच्या किमती, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत प्रति बॅरल 162.89 डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. विमान कंपनीच्या एकूण परिचालन खर्चापैकी सुमारे 40 टक्के खर्च इंधनावर होतो. सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे की, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक मार्ग ‘अव्यवहार्य’ झाल्याने विमान कंपनी आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये कपात करणे सुरू ठेवू शकते.
इंधन कपातीच्या संकटासह एअर इंडियाला आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी हवाई हद्द बंद झाल्यामुळे, या एअरलाइनला युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणांसाठी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणांसाठी आता व्हिएन्ना किंवा स्टॉकहोमसारख्या शहरांमध्ये थांबा घ्यावा लागत आहे. या लांबच्या मार्गांमुळे केवळ इंधनाचा वापरच वाढला नाही, तर कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आणि भत्तेही लक्षणीयरीत्या वाढले आहेत.
एअर इंडियाने दिल्ली ते शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय दरम्यानची उड्डाणे पूर्णपणे स्थगित करण्याची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे. यासह सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरोंटोसाठीची उड्डाणेही कमी करण्यात आली आहेत. एकूणच, कंपनीने दररोज सुमारे 100 उड्डाणे कमी केली आहेत. विमानात वापरल्या जाणाऱ्या जेट इंधनाच्या किमतीतील मोठ्या वाढीचा कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
कोणत्या शहरांमधील विमानसेवांवर परिणाम झाला?
एअर इंडियाने आपल्या दिल्ली केंद्रातून अनेक प्रमुख मार्गांवरील उड्डाणे पूर्णपणे स्थगित केली आहेत. यामध्ये शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरोंटो यांसारख्या ठिकाणांसाठीच्या उड्डाणांची वारंवारता कमी करण्यात आली आहे. एकूणच, एअरलाइनने आपल्या नेटवर्कमधून अंदाजे 100 दैनंदिन उड्डाणे कमी केली आहेत.
इंडिगोपेक्षा एअर इंडियाला जास्त तोटा का होत आहे?
एअर इंडिया हा इंडिगोचा प्रतिस्पर्धी आहे. इंडिगो इंडिगोपेक्षा एअर इंडियाला जास्त तोटा सहन करावा लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानी हवाई मार्ग आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना लांबच्या मार्गाने जावे लागत आहे. ज्यामुळे इंधनाचा वापर आणि कर्मचारी खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना आता व्हिएन्ना किंवा स्टॉकहोम येथे थांबा घ्यावा लागत आहे, ज्यामुळे खर्चात आणखी वाढ होत आहे.
सरकारकडून एअर इंडियाला मदत मिळणार का?
इंधन टंचाईमुले अडचणीत सापडलेली एअर इंडिया कंपनी सध्या सरकाकडून मदत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. एअर इंडियाला आधीच 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा होत आहे. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सवर खर्च कमी करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. एअरलाइनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “अनेक उड्डाणांमध्ये आम्हाला आमचा परिचालन खर्चही भागवता येत नाही.” गेल्या महिन्यात, फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (इंडिगो, एअर इंडिया , स्पाईसजेट) इशारा दिला होता की, जर सरकारने कर किंवा इंधनाच्या किमतींमध्ये सवलत दिली नाही, तर त्यांना सेवा स्थगित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 1.4 अब्ज लोकांना इंधन आणि प्रवासावरील खर्च कमी करण्याचे आवाहन केले आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आर्थिक संकट अधिकच गडद होत असल्याचे संकेत मिळतात, जिथे वाढत्या खर्चामुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतो.







