अमरावतीच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई (ATS Combing Operation) केली असून यात 11 जण शस्त्रांसह (Amravati Crime News) पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत रात्री (2 ऑक्टॉबर) दोन ठिकाणी मोठी कारवाई (Crime News) करण्यात आली. यात पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी येथे एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील 5 अज्ञात इसमांना शस्त्रांसह एटीएस व ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
संशयितांकडून पोलिसांवर फायरिंग झाल्याची चर्चा (ATS and District Rural Crime Branch Big Action)
तर, दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 6 जणांना शस्त्रांसह पकडण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी कश्यप पेट्रोल पंपाजवळ आणि ब्राह्मण सभा कॉलनीत संशयितांकडून पोलिसांवर फायरिंग झाल्याची चर्चा आहे. पोलीसांनी आतापर्यंत एकूण 11 आरोपींना शस्त्रांसह अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास अँटी टेरेरिस्ट स्क्वॉड (ATS) आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा करत आहेत.
राजकीय कार्यकर्त्याच्याहीसहभाग?
दरम्यान, या घटनांमुळे परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय कार्यकर्त्याच्या घराचा यात संबंध असल्याने चर्चांना उधाण आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र काल दसऱ्याच्या दिवशी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Chain Snatching: अंबरनाथमध्ये चोरट्याचा लोकलसमोर उडी मारून पळण्याचा प्रयत्न
अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची सोनसाखळी चोरी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी एका चोरट्याला पहिल्या दिवशी पकडले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी हाच चोरटा पुन्हा चोरी करण्यासाठी अंबरनाथ परिसरात आला. पोलिसांनी याची माहिती मिळताच सापळा रचला. चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकलसमोर उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना चोरट्याला पकडण्यात आणि घटनेची सत्यता पडताळण्यात मदत झाली. चोरट्याने केलेल्या सोनसाखळी चोरीचा आणि पळण्याच्या प्रयत्नाचा हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
