भारतानं दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर अर्थात ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर हल्ला करण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न फसलाय. पाकिस्ताननं पंजाब, (Jammu Kashmir) जम्मू, राजस्थान, गुजरातमधील अनेक शहर टार्गेट केली होती. मात्र, पाकिस्तानचा हल्ला भारतानं हवेत उडवून लावलाय. पाकिस्तानच्या मिसाइल्स तसंच ड्रोन भारतानं खाक केल्या आहेत. दरम्यान यानंतर भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलाय. भारतानं पाकिस्तानच्या 15 मोठ्या शहरांवर जोरदार हल्ला केलाय. भारतानं हल्ल्यात रावळपिंडीमधील लष्करी अधिका-यांची तळं देखील उद्धवस्त केली आहेत.. तसंच लाहोर, कराचीमधील एअर डिफेन्स सिस्टिम देखील भारतानं खाक केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक शहरात आणीबाणी लागू करण्यात आलीय. भारताच्या S-400नं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत.
चंदीगढमध्ये पुन्हा वाजले सायरन
चंदीगढमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले असून, नागरिकांना घरात राहण्याचा इशारा. ड्रोन हल्ल्याची शक्यता असस्यानं भारतीय सैन्य सज्ज.
देशातील 28 विमानतळं प्रवासी वाहतुकीसाठी बंद
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील 28 विमानतळं प्रवासी वाहतुकीसाठी बंद. लाल किल्ला, इंडिया गेट परिसरातील सुरक्षेत वाढ. राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवली.
