Search
Close this search box.

India Pakistan War : पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताच्या हल्ल्याने अस्वस्थ झालेला पाकिस्तान आता ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान भारतासोबतच्या आपल्या नापाक कारवायांद्वारे परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरकारी विभागांना स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच, यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या बनावट बातम्यांवर त्वरित कारवाई करा आणि त्या अधिक पसरू देऊ नका.  ही तर फक्त सुरुवात आहे.  दीर्घकाळासाठी तयार राहा, असे त्यांनी म्हटले आहे.

टीओआयने त्यांच्या सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की ही फक्त सुरुवात आहे. हे उल्लेखनीय आहे की 7 एप्रिल रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते.

यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत, अधिकाऱ्यांनी भविष्यातील योजनांबद्दल मंत्रिमंडळासमोर आपले विचार मांडले. सरकारने म्हटले आहे की, सर्व मंत्र्यांनी संघर्ष झाल्यास त्यांची जबाबदारी ओळखली आणि त्यावर पुढे जाण्याबद्दल बोलले. तसेच प्रमुख बंदरांची विशेषतः पश्चिम बंदराची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. यासोबतच, डाळी, खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक अन्नपदार्थ नियंत्रणात आहेत आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ते नियंत्रणात ठेवले जाईल असा सरकारला विश्वास आहे.

ही तर फक्त सुरुवात 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान “ही तर फक्त सुरुवात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचे समजते.  या बैठकीत जवळपास 20 वरिष्ठ सचिवांनी सहभाग घेतला होता. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, सचिवांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य आहे, मात्र ते त्यांच्या निर्देशांच्या चौकटीत असावेत. महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रालये आणि विविध एजन्सींमध्ये सुसंवाद आणि समन्वय राखणे गरजेचे आहे, जेणेकरून कामकाज सुरळीत चालू राहील आणि यंत्रणा अधिक प्रभावी बनतील. पंतप्रधानांनी सर्व सचिवांना त्यांच्या मंत्रालयातील कामकाजावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रणालींचा आढावा घेण्याची आणि त्यामध्ये कोणतीही त्रुटी तर नाही, याची खात्री करण्याचाही सल्ला दिला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें