काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाममध्ये (Pahelgam Terror Attack) 22 एप्रिल रोजी भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 भारतीय नागरीकांनी जीव गमावलाय. दरम्यान, भारतीय पर्यटक मृत्यूमुखी पडल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना भारत सरकारने मोठा निर्णय घेतला. भारतीय लष्कराने पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) सुरुवात केली आणि त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात झालीये.
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना रायगडमधील (Raigad crime news) एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या (Raigad crime news) पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर त्याच्याविरोधात पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम 353,1 ख व 353 ( 2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पुढील तपास सुरु केलाय.
सर्वधर्मीयांकडून देशविरोधी पोस्ट करणाऱ्या तरुणाचा निषेध
तरुणाने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून देशाविरुद्ध चिथावणीखोर विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पेण मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा जोरदार निषेध केला आहे. पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत ही निषेध रॅली काढण्यात (Raigad crime news) आली. यावेळी असंख्य नागरिक या निषेध रॅलीत सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, रायगडपूर्वी (Raigad crime news) पुण्यातील एका तरुणाने देखील देशविरोधी पोस्ट केली होती. पुण्यात वास्तवात असलेल्या तरुणीने पाकिस्तानच्य समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून तिच्या कॉलेजनेही तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
