उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी येथील ओला चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली असून त्याचं नावं अक्रम कुरेशी असं असून तो 22 वर्षांचा होता. प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी अक्रम कुरेशीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .याप्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
कसा घेतला शोध?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ, तानसा पाईप लाईन शेजारील रस्त्यावर 17 जानेवारी रोजी अक्रम इकबालुद्दीन कुरेशी (राहता जोगेश्वरी , मुंबई) हा ओला चालक गाडी भाडे घेऊन आला असता अज्ञाताने लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला.पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासा वरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
उत्तर प्रदेश कनेक्शन
महिलेकडे केलेल्या तपासात मोहमंद कैफ मोहंमद रफिक कुरेशी, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी,सलमान मोहम्मद, शफिक खान,सुहेल अहमद कुरेशी या सर्वांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथील मौजे हैदरपुरचे रहिवाशी असून तेथूनच पोलिसांनी शिताफीने सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचे आरोपींसोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै 2022 मध्ये भांडण झालं होतं. या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली.
पाच आरोपींना अटक
जस्सी तिवारीने मयत अक्रम कुरेशी यास प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रियकराला भेटीसाठी भिवंडी येथे बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्या सोबत कारमध्ये बसून गेली. त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रमवर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करीत या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास सध्या भिवंडी तालु
